
जयसिंगपूर : आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ. उंची वाढीच्या प्रश्नाकडे शासनाचे पूर्ण लक्ष आहे. यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही स्थितीत कोल्हापूर, सांगली जिल्हा पूरमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नांदणी (ता. शिरोळ) येथे सुरू असणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज भेट दिली.