Increase in air pollution : उसाच्या १८ लाख ६० हजार टन पाल्याचा धूर, जमिनीतील सेंद्रिय कर्ब घटला

Kolhapur News : जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. यातील उसाचे पाचट जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. जमिनीचा पोतही कमी होतो. उष्णतेने जमिनीचे आणि त्यातील उपयुक्त जीवजंतू, गांडुळाची अपरिमित हानी होते.
Increase in air pollution
Increase in air pollutionSakal
Updated on

-ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : जिल्ह्यात गळीत हंगामासाठी ऊस तोडणी सुरू आहे. उसाचा पाला सर्रास जाळला जातो. या पाल्याचे प्रमाण लक्षात घेतले, तर हेक्टरी १० टन पाला पडतो. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र सुमारे १ लाख ८६ हजार हेक्टर इतके आहे. यातील ऊस तोडल्यानंतर सर्वसाधारणपणे १८ लाख ६० हजार टन पाचट शिल्लक राहते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com