

नवी दिल्ली / कोल्हापूर : कर्नाटक सरकारकडून आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट पुन्हा वाढणार आहे, याकडे खासदार धैर्यशील माने यांनी लक्ष वेधले. याची गांभीर्याने दखल घेत आलमट्टीप्रश्नी केंद्र सरकार हस्तक्षेप करेल, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज येथे दिली. तसेच याप्रश्नी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणाच्या जलसंपदामंत्र्यांची बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती माने यांनी दिली.