आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी प्रक्रिया सुलभ झाली असून, लाभार्थ्यांना आता ‘मेरा E-KYC’ ॲपद्वारे मोबाईलवरून ई-केवायसी करता येणार आहे.
म्हाकवे : कागल तालुक्यातील ४० हजार ९५३ अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी (E-KYC) केलेली नाही. मार्चअखेर आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी न केल्यास त्यांना रेशनवर (Antyodaya Ration Card) मिळणारे धान्य बंद होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी मुदतीत आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे. आता मोबाईलद्वारेही ई-केवायसी करता येणार आहे.