कोल्हापूर: महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार हे कृत्रिम टंचाई निर्माण करत असून बारामतीच्या (Baramati) धरर्तीवर सर्वत्र दिवसा वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने द्यावा तसेच येत्या आठ दिवसांमध्ये वीज पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी भाजपचे (BJP) माजी आमदार सुरेश हळवणकर (Former MLA Suresh Halwankar) यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
विजेचे भारनियमन लादन हे चुकीचे आसून महावितरणाने याबाबत खुलासा करावा.
बारामतीमध्ये रात्रीच्यावेळी भारनियमन केलं जातं. मात्र कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यभरात दिवसा विज भारनियमन केलं जातं. महावितरण कंपनीने हे थांबवून घोषित भारनियमन सुरु करावं अशी मागणी त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, पुरेश्या प्रमाणात कोळश्याची उपलब्धता आहे. विज पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे. अशात विजेचे भारनियमन लादन हे चुकीचे आसून महावितरणाने याबाबत खुलासा करावा असे आव्हानही हळवणकरांनी केले.
बारामतीत रात्री ११ ते ५ या वेळेत भारनियमन केले जाते. मात्र महाराष्ट्रात इतर ठिकाणी सकाळी ११ ते ५ वेळेत भारनियमन केले जाते. राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने कोळसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध केला आहे. त्यामुळे राज्यात विजटंचाई होत नाही असा दावा केंद्राने तसेच महावितरणाने असताना भारनियमन लादन जात असल्याचेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.