
कोल्हापूर: देशाचे सरन्यायाधीश म्हटल्यानंतर प्रचंड सुरक्षा कवच. त्यातून ते आपल्याला भेटतील का? भेटले नाहीत तर किमान दूरवरून पाहता तरी येतील का?, या विचाराने आलेल्या नागरिकांची केवळ भेट नव्हे, तर शिष्टाचार, सुरक्षा बाजूला ठेवत त्यांच्याशी हस्तांदोलन करत फोटो काढून घेत, अनेकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी सर्वांचीच मने जिंकली. त्यांनी सामान्य माणसांपासून बंदोबस्तातील पोलिसांसोबतही चर्चा करत भेट संस्मरणीय केली.