
काल दिवसभरात जिल्ह्यात ६६ मिमी पावसाची नोंद, पंचगंगा नदीची पाणीपातळी ३६ फुटांवर
राधानगरी धरणातून ११,५०० क्यूसेक, काळम्मावाडी धरणातून २० हजार क्यूसेक विसर्ग
अलमट्टी धरणातून १.७५ लाख क्यूसेक पाणी सोडले जात आहे
कोल्हापूर–सांगलीत पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटक प्रशासनाशी समन्वय
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करा.
Collector Amol Yedge : कोल्हापूर जिल्ह्यात मागील २४ तासांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीसह विविध नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तरीही पूरस्थिती नियंत्रणात असून प्रशासन पूर्णतः सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे दिली.
जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले की, काल दिवसभरात जिल्ह्यात सरासरी ६६ मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे नद्यांमध्ये पाणीपातळी वाढली असून पंचगंगा नदीची पाणीपातळी ३६ फुटांवर पोहोचली आहे. दरम्यान, धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.