Kolhapur Crime : विजेचा शाॅक लागून 14 शेतकऱ्यांचा हकनाक बळी; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

सरकार आणि महावितरण कोणताही बोध घेत नसल्याने प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचा हकनाक बळी जात आहेत.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal
Summary

बाचणी (ता. कागल) येथे उच्च विद्युत वाहिनीची (Electrical Wire) तार खांबावरून तुटून अंगावर पडल्याने गीता जाधव (वय ३२) आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन जाधव (वय १४) या मायलेकरांना जीव गमवावा लागला.

कोल्हापूर : शेतात तुटून पडलेल्या वाहिनीला स्पर्श होऊन माय-लेकरं, सासू-सून, तरुण शेतकऱ्याचा (Farmer) मृत्यू अशा घटना वारंवार घडत आहेत. दोन ते तीन वर्षांत १२ ते १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

यातून सरकार आणि महावितरण कोणताही बोध घेत नसल्याने प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचा हकनाक बळी जात आहेत. जुने खांब, विद्युत वाहिन्या बदलल्या पाहिजेत, यासाठी शासन आणि महावितरण गांभीर्याने पुढाकार घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बाचणी (ता. कागल) येथे उच्च विद्युत वाहिनीची (Electrical Wire) तार खांबावरून तुटून अंगावर पडल्याने गीता जाधव (वय ३२) आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन जाधव (वय १४) या मायलेकरांना जीव गमवावा लागला. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण झाली. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील उसाच्या शेतात औषध मारताना शेतात तुटून पडलेल्या विजेची तार शेतकऱ्यांना दिसली नाही. यामध्ये अण्णासो दादू रांगोळे (वय ५२) यांचा तारेवर पाय पडला आणि त्यांना जोराचा धक्का बसल्याने मृत्यू झाला.

Kolhapur Crime News
Karnataka : काँग्रेस सरकार कोसळणार? सिद्धरामय्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

शिवाजी माने (हेरवाड, ता. शिरोळ) शेतात गहू कापण्यास गेल्यानंतर त्यांना शेतात तुटून पडलेल्या वीज वाहिनीचे स्पर्श होवून जागीच मृत्यूमुखी पडले. गुडमुडशिंगी येथील ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू-सुनेचा कपडे विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. ग्रामस्थांनी या तारांबद्दल वारंवार तक्रार देऊन त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले होते. यड्राव (ता. शिरोळ) येथील शेतकरी शेतात मशागत करत असताना शेतात पडलेली तार लक्षात आली नाही. याच तारेवार त्यांचा पाय पडल्याने मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबतचा इतर सहकारी गंभीर जखमी झाला आहे.

Kolhapur Crime News
UPSC Result : शेतकरी बापानं काबाडकष्ट करुन पोराला शिकवलं, पोरानंही पांग फेडलं; 'यूपीएससी'त अक्षयची यशाला गवसणी

शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून नुकसान

खराब आणि गंज चढलेल्या तारांमध्ये मोठ्या प्रमाणात शॉर्टसर्किट होते. यामुळे प्रत्येक वर्षी शेकडो एकर क्षेत्रातील उसाला आग लागते. पेटलेल्या उसाची नुकसानभरपाई दिली जात नाही. साखर कारखान्यांकडूनही पेटलेला ऊस वेळेत तोडला जात नाही. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसतो. थोड्या दिवसांसाठी चर्चा होते आणि त्या मृत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बदलून जाते.

Kolhapur Crime News
Solapur Crime : 'माहेरून आई-वडिलांकडून 50 लाख घेऊन ये'; हुंड्यासाठी विवाहितेला मारहाण

पावसाळ्यात उसाच्या सरीमध्ये पाणी भरलेले असते. गवत वाढलेले असते. यात तार तुटून पडलेली असेल, तर ती दिसून येत नाही. अशा तारा कालबाह्य झालेल्या असतात. खांबही खराब झालेले आहेत; पण याकडे कोणीही लक्ष देत नाही. शेतातील असे कालबाह्य खांब आणि तारा तत्काळ बदलल्या पाहिजेत.

- मोहन पाटील, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com