

पूरग्रस्तांसाठी प्रतिटन कपात करण्याचा निर्णय अखेर मंजूर.
esakal
Flood Hit Farmers Relief Cut : कुंडलिक पाटील : मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली.या बैठकीमध्ये पूरग्रस्तांसाठी पाच रुपये प्रतिटन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोल्हापुर विभागातून दहा कोटी तर राज्यातून ६० कोटीचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या बसणार आहे. काही दिवसापूर्वी या कपातीवरून विरोधक व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वादळ उठले होते. आज या कपातीवर शिक्कामोर्तब झाले. एकूण विविध कपातीतून उसातून प्रतिटन २७ रुपये ५० पैसे जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.