
Kolhapur Flood News : कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे नदीची पाणी पातळीत वाढ संथ असली तरी यावर्षी पुराचे काही ठोकताळे नव्याने अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी नदीची पाणी पातळी ४५ फुटांवर गेली की कसबा बावडा-शिये रस्त्यावर पाणी येत होते. मात्र, यावर्षी ते ४१ फुटांवरच आले आहे. नदीची पाणी पातळी ४३ फुटांवर गेली की केर्ली येथे पाणी येऊन कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद होत होता. मात्र यावर्षी ४० फुटांवरच या महामार्गावर पाणी आले. पूरप्रवण क्षेत्रातील बांधकामे, रस्त्यांचे भराव यामुळे कमी पातळीतच हे मार्ग पाण्याखाली जात आहेत.