

Farmers in Kolhapur welcome the release of the first beneficiary list under the Maharashtra Farmer Loan Waiver Scheme
sakal
कोल्हापूर: पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २३, ३१६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे. याच्या याद्यांची प्रसिद्धी आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्व १९१ शाखांमध्ये केली. प्रत्यक्षात कोणाला किती रक्कम मिळणार याचा अंदाज सोमवारी (ता.२७) येणार आहे. जिल्ह्यातील एकूण तेरा विभागापैकी करवीर पश्चिममध्ये सर्वाधिक कर्जमाफी झाली आहे.