Protest Erupts at Kolhapur Airport Villagers Try to Enter Through Main Gate

Protest Erupts at Kolhapur Airport Villagers Try to Enter Through Main Gate

Esakal

Kolhapur : आमचं गाव नाही का, विमानानं जाणारीच माणसं आहेत काय? रस्त्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक, विमानतळावर आंदोलन

कोल्हापूर विमानतळावर नेर्ली आणि तामगावच्या ग्रामस्थांनी मोर्चा काढला आहे. नेर्ली ते उजळाईवाडी हा रस्ता बंद केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मुख्य गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्यानं गोंधळ निर्माण झालाय.
Published on

कोल्हापूर विमानतळाजवळचा उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव हा रस्ता बंद केल्याने नेर्ली व तासगाव (तामगाव) येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने रस्ता बंद करून पर्यायी रस्ताचे काम न केल्याने नागरिकांना खूप हाल होतआहेत. विमानतळाची सुरक्षा आणि विस्तारीकरण यामुळे हा रस्ता बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. हा रस्ता बंद केल्यानं दोन्ही गावच्या ग्रामस्थांना दहा किलोमीटर फिरून जावं लागत आहे. पर्यायी रस्ता सुरू होत नाही तोपर्यंत सध्याचा रस्ता सुरू करून द्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जातेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com