कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किरणे चांदीच्या उंबऱ्यापर्यंतच पोहोचली. आज ढगाळ वातावरण नसेल तर किरणे देवीच्या मुखकमलापर्यंत पोहोचतील, अशी आशा होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे किरणांची (Ambabai Temple Kiranotsav in Kolhapur) तीव्रता कमी होती. ज्यामुळे किरणे कशीबशी मंदिराच्या चांदीच्या उंबऱ्यापर्यंतच पोहोचू शकली.