Natural river embankment risk : जिल्ह्यात नदीचे नैसर्गिक बांध माती उत्खननामुळे धोक्यात; पात्र विस्तारण्याची भीती

Kolhapur News : गेल्या काही दिवसांपासून नदीकाठी असणाऱ्या काही जमिनींमध्ये सर्रास उत्खनन केले जात आहे. वीटभट्टी, शहरातील घरगुती बागांमध्ये लागणारी माती अशा विविध कारणांसाठी येथील माती काढली जात आहे.
Kolhapur district in Natural river embankments at risk due to soil excavation
Kolhapur district in Natural river embankments at risk due to soil excavationSakal
Updated on

-ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : जिल्ह्यात पंचगंगा, भोगावतीसह अन्य नदीकाठी शेतकऱ्यांनी खासगी जमिनीत माती उत्खनन सुरू केले आहे. वीटभट्टीसाठी ही माती वापरली जाते, मात्र यामुळे नदीच्या पात्रालगत असणारे नैसर्गिक बांध (लेव्ही) नष्ट होत असून, त्यामुळे महापूर काळातील नुकसानीचे प्रमाण वाढणार आहे. हे बांध म्हणजे भूरूप आहेत. हे बांधच नष्ट झाले, तर नदीची परिस्थिती (इकॉलॉजी) धोक्यात येणार आहे. करवीर तालुक्यातील कोगे गावामध्ये अशाप्रकारे सुमारे ५० हेक्टर जमिनीवर उत्खनन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com