
कोल्हापूर : शुक्रवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील गुऱ्हाळ घरांना बसला आहे. या पावसामुळे गुऱ्हाळ घरात पाणी शिरून ती बंद झाली. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या गुऱ्हाळमालक शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसला आहे. दुष्काळात तेरावा महिना अशीच स्थिती गुऱ्हाळमालकांची झाल्याचे पाहायला मिळत आहे.