

Kolhapur
esakal
कोल्हापूर: गेल्या आठवड्यात थेट पाईपलाईन योजनेचा एकमेव सुरू असलेला पंप काळम्मावाडी धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने पुन्हा बंद पडला, तर पंचगंगा नदीतीलही पातळी कमी होत असल्याने शिंगणापूर योजनेतील चौथा पंप बंद ठेवावा लागत आहे. धरणातून योग्य प्रमाणात पाणी सोडले नाही तर बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर योजनेतून कमी उपसा होऊन शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.