
पतीने सोडचिठ्ठी द्यावी आणि त्यासह दोन महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं अशी चिठ्ठी लिहून स्मशानात अघोरी प्रकार केल्याची घटना कोल्हापुरात समोर आलीय. स्मशानभूमीत बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल अन् हाताने लिहिण्यात आलेला एक कागद सापडला आहे. पतीसोबत संसार नीट होत नसल्यानं आणि सासरच्या छळाला त्रासलेल्या महिलेकडून हा प्रकार करण्यात आलाय. तिने पतीचं नाव चिठ्ठीत लिहिलंय, त्याच्यापासून सोडचिठ्ठी मिळावी असंही त्यात लिहिलं आहे.