
कोल्हापूर जिल्ह्यातील एका मठात राहणाऱ्या हत्तीणीला लोक महादेवी आणि माधुरी या नावानेही ओळखतात. महादेवी नंदिनी मठाचा भाग बनली होती. पण आता कोल्हापूरची महादेवी हत्तीणी अनंत अंबानींच्या वनतारा येथे पाठवण्यात आली आहे. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की हत्तीणी आजारी असल्याने आणि तिची येथे योग्य काळजी घेतली जात नसल्याने तिला वंतारा येथे पाठवण्यात येईल. यानंतर वातावरण तापले आहे. तिला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर प्रयत्न करत आहे. आता या वादात स्टॅण्ड अप कॉमेडीयन कुणाल कामरानेही उडी घेतली आहे. ट्विट करत त्याने अंबानींवर टीका केली आहे.