Eknath Shinde Prakash Abitkar
Eknath Shinde Prakash Abitkaresakal

Eknath Shinde : आमदार आबिटकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं 'ते' पत्र व्हायरल; राजकीय चर्चांना उधाण

पावसाळ्यात या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम राबविणे सर्वांच्याच गैरसोयीचे होणार आहे.
Summary

‘बिद्री’बाबत सहकार आयुक्त काय निर्णय घेतात? याकडे कार्यक्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बिद्री : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची (Dudhganga Vedganga Sugar Factory Election) होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक येत्या पावसाळ्यानंतर (३० सप्टेंबर) घ्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे मागणी करणारे आमदार प्रकाश आबिटकर यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या पत्रानुसार मुख्यमंत्र्यांनी सहकार आयुक्त, पुणे यांच्याकडे शिफारस केली आहे. त्यामुळे 'बिद्री'ची निवडणूक आता पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. आमदार आबिटकर (Prakash Abitkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बिद्रीच्या कार्यक्षेत्रात ७ जूनपासून पावसाला सुरुवात होते. या कारखान्याच्या एकूण सभासदांपैकी सुमारे ४० हजार सभासद हे राधानगरी, भुदरगड या दोन तालुक्यांतील आहेत.

Eknath Shinde Prakash Abitkar
Kolhapur : महत्वाची बातमी! कोल्हापूर, साताऱ्यातील 536 उद्योजकांना नोटिसा; MIDC नं दिला थेट इशारा

पावसाळ्यात या तालुक्यांत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे महापूरसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम राबविणे सर्वांच्याच गैरसोयीचे होणार आहे. त्यामुळे बिद्रीची निवडणूक (Bidri Election) पावसाळ्यानंतर (३० सप्टेंबर) घ्यावी.

Eknath Shinde Prakash Abitkar
Chandrapur : मोठी बातमी! चंद्रपुरात काँग्रेसनं गमावला मोठा नेता; खासदार बाळू धानोरकर यांचं 48 व्या वर्षी निधन

अशा प्रकारचे आदेश संबंधितांना निर्गमित करावेत. दरम्यान, यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सहकार आयुक्त, पुणे यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Prakash Abitkar
Success Story : जिद्द असावी तर अशी! अंथरुणाला खिळलेल्या पवनकुमारनं 'या' परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

चेंडू सहकार आयुक्तांच्या कोर्टात

राज्यात अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मग पूर परिस्थितीचे कारण सांगून फक्त ‘बिद्री’चीच निवडणूक पुढे ढकलणार की संपूर्ण राज्यात हा नियम लागू होणार? ‘बिद्री’बाबत सहकार आयुक्त काय निर्णय घेतात? याकडे कार्यक्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com