सेफ सिटी असुरक्षित ; चोरट्यांनी पोलीस यंत्रणेलाच दिले आव्हान

सेफ सिटी असुरक्षित ; चोरट्यांनी पोलीस यंत्रणेलाच दिले आव्हान

जयसिंगपूर (कोल्हापूर) : बाजारात खिशातील मोबाईल लंपास करण्याच्या घटना शहरात घडत होत्या. आता कानाला लावून बोलत असतानाच हातोहात मोबाईल लंपास करून पोबारा करण्याच्या घटना शहरात घडू लागल्या आहेत. मोबाईल चोरट्यांचे धाडस वाढले असताना मोबाईल चोरटे मात्र कारवाईविना खुले आम फिरत आहेत. मोबाईल चोरट्यानी पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले आहे.

शहरातील मुख्य क्रांती चौकानजीक गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या कानाला लावून बोलत असतानाच मोबाईल हिसडा मारून लंपास करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. शहरातील आठवडा बाजारात हमखास मोबाईल चोरीच्या घटना घडतात. बऱ्याचदा कशाला उगाच पोलिसात फिर्याद द्यायची म्हणून अनेक जण चोरीच्या घटनेकडे कानाडोळा करतात. यामुळेच चोरट्यांचे धाडस वाढत जाते.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोबाईल चोरीच्या घटना नित्याच्या होऊन बसल्या आहेत. अनेक घटनांची नोंद पोलिसात झाली आहे. मात्र, चोरटे काही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. शहरात लोकवर्गणीतून तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सीसीटीव्ही प्रकल्प मार्गी लावला. शहरातील चोरीच्या घटनांसह मारामारी, वाहन चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी हा प्रकल्प खूपच महत्त्वपूर्ण ठरला. मात्र, त्यांच्या बदलीनंतर शहरातील अनेक कॅमेरे सध्या शोभेच्या बनल्या आहेत. गजबजलेल्या परिसरात दिवसा घडणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटनांनी यंत्रणेला आव्हान दिले असताना पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचत नाहीत ही बाब नागरिकांना चिंतेची वाटत आहे.

सेफ सिटी बनली असुरक्षित

सेफ सिटी प्रकल्पांतर्गत लोकवर्गणीतून शहरात सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यात आला. मात्र, तो सुरळीत चालवता आला नाही. बंद असलेला चेक नाका पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या प्रयत्नातून सुरू झाला. त्याप्रमाणे सीसीटीव्ही प्रकल्प विनादोष सुरू करून चोरट्यांच्या मुसक्या अवळण्याची मागणी होत आहे.

Summary

चौकात वाहतूक पोलीस असतानाही अशा घटना घडत असल्याने चोरट्यांचे धाडस वाढले आहे.

हाकेच्या अंतरावर पोलीस तरीही चोऱ्या

दोन दिवसांपूर्वी शहरातील क्रांती चौकानजीक साई बेकरीसमोर एक व्यक्ती मोबाईलवर बोलत असताना तो हातोहात लंपास करण्यात आला. घटनेवेळी चौकात वाहतूक पोलीस असतानाही अशा घटना घडत असल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.

चोरीऐवजी गहाळ नोंद

मोबाईल चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदारांकडून गहाळ अशी नोंद घेतली जात असल्याच्या तक्रारी असून अप्रत्यक्षपणे चोरीच्या घटनांना खतपाणी घातले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com