कोल्हापूर : मेन राजाराम हायस्कूल बंद होण्याच्या मार्गावर

व्यावसायिकांचा जागेवर डोळा? पाचवी ते सातवीचे वर्ग बंद
 Main Rajaram High School
Main Rajaram High Schoolsakal

कोल्हापूर : येथील मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या संस्थेतून धडे गिरवले. मात्र, सध्या या हायस्कूलची अवस्था दयनीय आहे. विद्यार्थी नसल्याने पाचवी ते सातवीचे वर्ग बंद आहेत. पुढील वर्गातील विद्यार्थी संख्याही जेमतेम आहे. दशकभरात शाळा बंद पडत चालली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या इमारतीवर काही व्यावसायिकांचा डोळा असल्‍याची चर्चा असून, शाळा बंद पाडली जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थापना १८५१ ची आहे. १५ फेब्रुवारी १८७० ला शाळेची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली. या शाळेला १५० वर्षांची परंपरा असून, सध्या शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे आहे. २००० पर्यंत शाळेची स्थिती चांगली होती. मात्र, नंतर शिक्षकांची रिक्त पदे वाढली. शिक्षकच नसल्याले पालकही मुलांना या शाळेत पाठवण्यास फारसे उत्सुक नव्हते. कालांतराने शाळेची पट संख्या खालावली.

 Main Rajaram High School
Voter ID link to Aadhar: आता मतदार ओळखपत्रही आधारला लिंक करावे लागणार?

सध्या या शाळेत पाचवी ते सातवीचे वर्ग बंद आहेत. आठवी ते दहावीसाठी केवळ चार शिक्षक आहेत. बरीच वर्षे गणित, विज्ञान या विषयांना शिक्षकच नव्हते. आठ दिवसांपासून येथे या विषयांचे शिक्षक हजर झाले आहेत. सध्या येथे आठवीचे पाच विद्यार्थी आहेत. नववी आणि दहावीचे प्रत्येकी नऊ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेला पुरेसे शिक्षक का दिले जात नाहीत?, विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी का प्रयत्न होत नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. जिल्हा परिषदेच्या काही शाळांनी राज्यात नावलौकिक केला असताना शहराच्या मध्यवस्तीमध्ये प्रशस्त इमारतीमध्ये भरणाऱ्या या शाळेच्या बाबतीत प्रशासन उदासिन का? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. काही व्यावसायिकांचा या जागेवर डोळा असल्याने ही शाळा बंद पाडली जात असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष दिले नाही तर एक मोठा ऐतिहासिक वारसा आपण गमावण्याची भीती आहे.

 Main Rajaram High School
स्थगित जागांची निवडणूक जानेवारीत

कनिष्ठ महाविद्यालयाला प्रतिसाद

सध्या येथे अकरावीचे ३२५, तर बारावीचे ३१५ विद्यार्थी आहेत. १३ शिक्षक कार्यरत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी येतात, मग हायस्कूलला का नाही?

सध्या शाळेत विद्यार्थी संख्या जेमतेम आहे. पण, आम्ही शिक्षकांनी विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले. फेब्रुवारीपासून शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांच्या पालकांशी संवाद साधला जाणार आहे. त्यांना शाळेत प्रवेश देऊन पट वाढविण्यावर भर राहील.

- एस. एस. नाईक, मुख्याध्यापक, मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com