why farmers are not getting PM Kisan installment
esakal
कुडित्रे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता नुकताच वितरित (PM Kisan 22nd Installment) झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख ६४ हजार ८६९ लाभार्थ्यांच्या खात्यावर ९३.४४ कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील ११ हजार ५४८ शेतकरी तांत्रिक निकष अपूर्ण असल्याने या लाभापासून वंचित राहिले आहेत. वारंवार आवाहन करूनही ई-केवायसी, आधार आणि लँड सीडिंगची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ही परिस्थिती असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.