
Shaktipeeth Highway : कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गास सम्मती दिली असल्याचा कांगावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यात त्यांचा ढोंगीपणा समोर आला आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ३५ शेतकऱ्यांनीच ७/१२ दिले असून १ टक्काही लोकांचे शक्तीपीठ महामार्गास समर्थन नसल्याचे दिसून आले अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.