कोल्हापूर: केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे भले करत नाही. याची खात्री पटल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आघाडी सरकारमधून (Maha Vikas Aghadi) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावरून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीसोबतच राहावे, अशी इच्छा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी तशी घोषणा केली असली तरी त्यांनी महाविकास आघाडीसोबतच राहावे. राजू शेट्टी यांना बाहेर पडण्याचे कोणते कारण वाटतेय माहिती नाही. एखादी गोष्ट मला किंवा कोणत्याही मंत्र्यांना सांगितली आणि त्यांच्या कामांना नकार दिला असेही काही झालेले आठवत नाही. त्यामुळे त्यांनी बाहेर पडू नये असेही ते म्हणाले.
भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकरीविरोधी गोष्टी भाजप करत आहे. त्यांनी आघाडीसोबत राहून याचा प्रतिवाद करायला हवा. सर्व पक्षांची ताकद घेऊन देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी लक्ष घालावे यासाठी आघाडी सोडू नये असेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.