Maharashtra Weather Update : खवळलेल्या समुद्रामुळे अद्याप संकट कायम; यंत्रणा ‘अलर्ट’, हवामान विभागाचा इशारा काय?

Arabian Sea : अरबी समुद्र खवळलेला असून किनारपट्टी भागात अद्याप संकट कायम आहे. हवामान विभागाने उच्च लाटांचा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने यंत्रणा सतर्क असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Weather Update

खवळलेल्या समुद्रामुळे अद्याप संकट कायम; यंत्रणा ‘अलर्ट’, हवामान विभागाचा इशारा काय?

esakal

Updated on

IMD Alert Arabian Sea : गेले दोन दिवस किनारपट्टीवर जोरदार वारे आणि खवळलेल्या समुद्रामुळे प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. मत्स्य आणि बंदर विभागाकडून मच्छीमार तसेच सागरी पर्यटन व्यावसायिकांना समुद्रात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. खराब समुद्री हवामानामुळे सलग चौथ्या दिवशी सिंधुदुर्ग किल्ले प्रवासी होडी वाहतूकही बंद होती. दरम्यान, वादळी हवामानाचा मासेमारी आणि पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. ऐन हंगामात आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com