
विवेक पाटील
शिंगणापूर : खांडसरी नाका कचऱ्याचा विषय गंभीर बनत आहे. तीन ग्रामपंचायती आणि महानगरपालिका यांच्या समन्वयाच्या अभावाने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले कचरा उठावाचे आदेश फक्त कागदावरच असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. किती जागृती केली, तरी लोक ऐकत नाहीत, असे तिन्ही गावच्या सरपंचांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिघांनी येथे ३६० अँगल सीसीटीव्ही बसवावा व त्यांचे नियंत्रण जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ यांच्या नियंत्रणात ठेवावे, मागणी केली आहे.