
Satej Patil
esakal
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठे नुकसान – अनेक गावे पाण्याखाली, शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान.
सतेज पाटील यांचे आवाहन – कोल्हापूरकरांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू जमा कराव्यात.
मदत संकलन कालावधी – २४ ते २८ सप्टेंबरपर्यंत मदत जमा; २९ सप्टेंबर रोजी ट्रकद्वारे मदत रवाना होणार.
Marathwada Flood Crisis : सध्या मराठवाडा अतिवृष्टीमुळे भीषण संकटात सापडला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून शेतकरी, सामान्य नागरिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.