Kolhapur : मनोधैर्य योजनेचा पीडितांना आधार

लाखोंचे अर्थसाह्य; विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार
Kolhapur
Kolhapursakal

कोल्हापूर : राज्य शासनाने महिला व बालविकास विभागातर्फे अत्याचार झालेल्या पीडित महिला आणि बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी सुधारित ‘मनोधैर्य योजना’ कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत १६१ पीडिताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून ६७ लाख ४० हजार रुपये अर्थसाह्य करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. सी. चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मनोधैर्य योजनेची प्रक्रिया राबवली जाते. आतापर्यंत अत्याचाऱ्याच्या खटल्यातील १५ पीडित महिला, पोक्सोअंतर्गत गुन्ह्यातील १४४ बालके आणि ॲसिड हल्ल्यातील दोन पडितांबरोबर अनैतिक व्यापार प्रतिबधक नियमाअंतर्गत अल्पवयीन पीडितांना प्राधिकरणामार्फत ६७ लाख ४० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे कागदपत्रे प्राप्त झालेपासून सात दिवसांच्या आत तीस हजार रुपये इतकी रक्कम पीडिताच्या वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मंजूर करण्यात येते. अंतिम रक्कम पीडितेचा न्यायालयातील निकाल लागलेनंतर तिला जातो, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रितम पाटील यांनी दिली.

दृष्‍टिक्षेपात

  • ॲसिड हल्ल्यातील पीडितांना १० लाख ३० हजारांची तत्काळ मदत

  • गरजू पीडित महिला व बालकांना मोफत वकील

  • मनोधैर्य योजनेचा चार वर्षांपासून सुरू

  • जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे ३७९ अर्ज दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com