कोल्हापूर : मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेले तीन कृषी विधेयक रद्द करावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आत्मक्लेश आंदोनल सुरू केले आहे. आज (ता. ३) सायंकाळी 7 ते उद्या (शुक्रवारी ता. 4) सकाळी 7 पर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. यामध्ये रात्रभर भजन, किर्तण करत आत्मक्लेश करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात येणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत काल माहिती दिली होती. शेतकरी तर येतीलच पण ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत असे वाटते त्यांनीही या मुर्दाड सरकारला जागं करण्यासाठीच या आंदोलनात सहभाग घेण्याचे आवाहन श्री शेट्टी यांनी केले आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयसमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी सकाळशी बोलताना दिली.
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कृषी मालाला हमी भाव मिळाला पाहिजे किंवा त्याचा दर ठरवण्याची मुभा शेतकऱ्यां दिली पाहिजे ही या आंदोलनातील प्रमुख मागणी आहे. शिवाय सरकारने उद्योगपतींच्या हितासाठी तीन कृषी विधेयक केले आहे. ते तात्काळ रद्द करावेत. शेतकऱ्यांना अदाणी आणि अंबानींचे गुलाम करु नका. द्या, अशी मागणी केली जात आहे. मात्र, हे आंदोलन शिखांचे आहे. खलिस्तानवाद्यांचे आहे. असे म्हणून शेतकऱ्यांना हिनवले आहे. या आंदोलनाला प्रांतीय आणि राजकीय रंग दिला आहे. पण सरकारने शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणू नये. त्यांना त्यांच्या हक्काची शेती करु द्यावी, अशी मागणी श्री शेट्टी यांनी केली. कायद्याने बंधनकारक असणारा हमी भाव मिळावा. पण सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रत्येकाला या आंदोलनात जावे असे वाटते. आपण जावू शकत नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी आत्मक्लेश आंदोलन केले जाईल. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाईल.
हे पण वाचा - अजबच; मांजर गायब झाल्याने दोघांना काठीने मारहाण
संध्याकाळचे जेवण घेवूनच शेतकरी हे आंदोलन करतील. रात्रभर भजन, किर्तन करत आत्मक्लेश केला जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.
हे पण वाचा - खून प्रकरणी दोघा सख्या भावांना आजन्म कारावास
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.