कोल्हापूर : यंदा खरीप लागवड होणार दोन लाख हेक्‍टरवर

आतापर्यंत २२ हजार टन खतांचा पुरवठा
Rice Cultivation
Rice CultivationSakal

कोल्हापूर - जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी दोन लाख चार हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे. यासाठी ३९ हजार ९७१ क्विंटर विविध बियाणांची मागणी केली आहे, तर एक लाख ७० हजार टन खतांची मागणी केली आहे. यापैकी आत्तापर्यंत २२ हजार टन खतांचा पुरवठा झाला आहे. उर्वरित या चार महिन्यांत केला जाणार आहे.

जिल्ह्यात बियाणे व खतांचा तुटवडा होऊ नये यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून नियोजन केले आहे. यामध्ये ३९ हजार ९७१ क्विंटल बी-बियाणांची मागणी केली आहे. महाबीजकडून २१ हजार ४८२ क्विंटल, खाजगी उत्पादकांकडून १३ हजार ९८९ क्विंटल व शेतकऱ्यांनी स्वत:कडील ४५०० क्विंटल बियाणे तयार केले आहेत. याच बियाणांचा वापर यंदाच्या खरीप हंगामात होणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे म्हणाले, ‘यंदा पावसाचे प्रमाण चांगले असेल. यासाठी आतापासून खरिपाचे नियोजन सुरू आहे. खते, बियाणांसह इतर कृषी उपयोगी वस्तूंचे साहित्य मुबलक असावे यासाठी नियोजन केले आहे. बियाणे व खतांचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल. तुटवडा जाणवणार नाही, अशी परिस्थिती आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com