हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपसा केले जाते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कुडित्रे : एकीकडे जिल्ह्यात पाण्याची टंचाई आणि दुष्काळ दुसरीकडे नदीला दूषित पाणी यामुळे मासे, जीवजंतू व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. काल (शनिवार) सकाळी भोगावती नदीत (Bhogavati River) मळीमिश्रित पाणी आल्याने कोगे - बहिरेश्वर बंधाऱ्याजवळ हजारो मासे (Fish) मृत्युमुखी पडले. तडफडणारे मासे पकडण्यासाठी तरुण व ग्रामस्थांची झुंबड उडाली.
त्यामुळे कोगे-बहिरेश्वर पुलावर (Koge-Bahireshwar Bandhara) काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. दूषित पाणी आले कुठून, त्यांच्यावर कारवाई होणार का, आणि प्रदूषण मंडळ अशा वेळी काय करते, असा संतप्त प्रश्न यावेळी उपस्थित केला जात होता. आज सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान मळीमिश्रित पाणी नदीला आले. पाण्याला पाण्याला दुर्गंधी येत होती आणि पाणी काळे झाले होते. दूषित व मळीमिश्रीत पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले.
नदीला दूषित पाणी आल्याची माहिती गावात पसरताच बहिरेश्वर, कोगे व परिसरातील गावातून तरुण बहिरेश्वर बंधारा येथे मासे पकडण्यासाठी जमू लागले. यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. पाणी काळे झाल्याने दुर्गंधी होती. मोठ्या प्रमाणावर मासे तडफडू लागले. नदीच्या काठाला मासे आल्यामुळे नागरिक काठीने मासे मारत होते. दरम्यान आठ दिवसांपूर्वी महे येथे नदीला दूषित पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाले होते. यानंतर हेच पाणी पुढे आले असावे, अशी चर्चा घटनास्थळी होती.
मळीमिश्रित काळे पाणी होते. पुढे सर्व गावातून पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा वापर केला जातो यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडणार असल्याचे चित्र आहे. प्रदूषण मंडळाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. यावेळी रंगराव पाटील, बळीराम नाळे, संग्राम यादव व ग्रामस्थ तरुण उपस्थित होते. दरम्यान, हेच पाणी कुडित्रे, वाकरे, पाडळी खुर्द, बालिंगा, दोनवडे, शिंगणापूर बंधाऱ्याला जाऊन मिळणार आहे. यामुळे ही दूषित पाणी शहरात जाण्याचा धोका आहे.
हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपसा केले जाते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून नदीकाठच्या महे, कसबा बीड, कोगे , बहिरेश्वर आदी भागांतील नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
नदीला सकाळी काळे मळीमिश्रित पाणी आले.यामुळे मासे तडफडू लागले. नागरिकांनी मासे पकडण्यासाठी गर्दी केली होती. दूषित पाणी आले कुठून त्यांची चौकशी व्हावी.
-रंगराव पाटील, बहिरेश्वर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.