
Ichalkaranji’s Krishna river water pumping halted; citizens face shortage after rats disrupt supply.
Sakal
पंडित कोंडेकर
इचलकरंजी: शहरात सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा करण्यास दोन उंदीर कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या मजरेवाडी उपसा केंद्राच्या ट्राॅन्सफाॅर्मरमध्ये बिघाड या दोन उंदिरामुळे झाला. वायर कुरतडत असतांना शाॅर्ट सर्किट झाल्यामुळे ट्राॅन्सफाॅर्मर उडाला. त्यामुळे चार दिवस कृष्णा नदीतून होणारा उपसा थांबला. परिणामी, शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून अद्यापही नागरिकांना सात दिवसानंतर नळाला पाणी मिळत आहे.