जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रे यंदा होणार शुध्द गुलालाचीच उधळण

केमिकल युक्त गुलाला मुळे भाविकांच्या अरोग्यावर दुष्परिणाम
जोतिबा
जोतिबा sakal

जोतिबा डोंगर : महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर यंदाच्या चैत्र शुद्धच गुलालाची उधळण होणार आहे.आता केमिकलयुक्त गुलाल विक्री करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे .या केमिकल युक्त गुलाला मुळे भाविकांच्या अरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जोतिबा डोंगरावर आज प्रांताधिकारी अमित माळी तहसीलदार रमेश शेंडगे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे सरपंच राधा बुणे यांच्या प्रमुख उपस्थीतीत व्यापारी दुकानदार ग्रामस्थ पुजारी यांची बैठक झाली .या मध्ये केमिकल युक्त गुलालाविषयी सविस्तर चर्चा झाली. व्यापारी दुकानदारांनी बैठकीत शुद्धच गुलाल विक्री करण्याची ग्वाही दिली.

पूर्वीचा नैसर्गिक सुगंध असणारा शुध्द असा गुलाल विक्रीस ठेवण्याच्या सूचना व्यापाऱ्याना देण्यात आल्या. यात्रेपूर्वी डोंगरावर येणाऱ्या गुलालाची विशेष पथकाव्दारे तपासणी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी गुलाल तयार केला जातो . तेथे डोंगरावर पाठविला जाणाऱ्या गुलालाची पाहणी केली जाणार आहे. आजच प्रशासनाने या ठिकाणी संपर्क करून शुध्दच गुलाल पाठविण्याच्या सूचना दिल्या.

जोतिबाच्या चैत्र यात्रेत ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत देवाची पालखी व शिखरावर गुलाल-खोबरे उधळण्याची परंपरा आहे. राज्यातून दर्शनाने आलेल्या भाविकांचे सर्व अंग गुलालात न्हाऊन निघते. हाच गुलाल महाराष्ट्रासह अन्य राज्यातील कानाकोपऱ्यात जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची महती घेऊन जातो. डोंगरावर येणारा गुलाल हा इस्लामपूर कुंडल ( सांगली )टाकळी ( पंढरपूर ) व वाई या ठिकाणी तयार केला जातो .जोतिबा डोंगरावर येणार गुलाल हा सर्रास केमिकल युक्त असून तो आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे .पूर्वीचा गुलाल हा नैसर्गिक व सुगंध युक्त होता. तो फुले व साबु पासून तयार करत.त्यापासून इजा होत नव्हती. त्यामुळे आता डोंगरावर नैसर्गिक गुलाला शिवाय पर्याय नाही. यंदा प्रशासनाने शुध्द गुलालाची सक्ती केल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे

डोंगरावर चैत्र यात्रेत मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला जातो.केमिकल युक्त गुलालामुळे त्वचेवर परिणाम होतात. येथे भेसळयुक्त गुलाल मोठ्या प्रमाणात येतो. यंदाच्या यात्रेत या गुलालावर प्रशासनाने बंदी घातली आहे. शुध्दच गुलाल यंदाच्या चैत्र यात्रेत वापरला जाणार आहे. यात्रेपूर्वी गुलालाची तपासणी केली जाणार आहे.

अमित माळी,प्रांताधिकारी पन्हाळा

२०१९ पासून जिल्हा प्रशासनाने खोबरे वाटी फेकण्यास बंदी घातली आहे. कारण त्यामुळे भाविक जखमी होऊ लागलेत. यंदा ही बंदी कायम असून खोबरे वाटीचे तुकडे करूच ते उधळावे . व्यापारी दुकानदारांनी तुकडे करुनच विक्री करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आज डोंगरावर दहा गावकर ग्रामस्थ पुजारी यांची ही बैठक झाली. बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com