एनडीआरएफचे जवान मानवतेचे पुजारी : प्रा. डॉ. एन. डी. पाटील

एनडीआरएफचे जवान मानवतेचे पुजारी : प्रा. डॉ. एन. डी. पाटील

सातारा : नैसर्गिक आपत्तीच्या काळात जात, धर्म, पंथ विसरून एनडीआरएफचे जवान प्राणांची बाजी लावून नागरिकांचे जीव वाचवितात. ते खरे मानवतेचे पुजारी आहेत. त्यांचा गौरव समाजाने केलाच पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले.

जरुर वाचा - धावताय... अशी घ्‍या हृदयाची काळजी
 
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना संस्थेचे मानद सचिव इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार एनडीआरएफच्या जवानांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी बोलत होते.
 

कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, कायदा सल्लागार ऍड. दिलावर मुल्ला, सहसचिव प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत उपस्थित होते.

प्रा. डॉ. पाटील म्हणाले, ""रयत शिक्षण संस्था सातत्याने मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कार्य करत आहे. गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत एनडीआरएफच्या जवानांनी केलेले कार्य पश्‍चिम महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. या जवानांचे कार्य मानवतावादीच आहे. म्हणूनच मानवतेचे पुजारी असलेल्या एका महान व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार त्यांना प्रदान केला जात आहे.''

इस्माईलसाहेब मुल्ला यांनी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी संस्थेत 35 वर्षे विनावेतन काम केले. कर्मवीरांचे ते सच्चे साथी होते. त्यांचे कार्य संस्था नंदादीपासारखे तेवत ठेवेल, असेही त्यांनी नमूद केले.

अवश्य वाचा -  हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत 

डॉ. अनिल पाटील म्हणाले, ""कर्मवीरांच्या पश्‍चात माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, रामभाऊ नलावडे, आप्पासाहेब पाटील अशा अनेकांनी मोठे योगदान दिले. त्यामध्ये इस्माईलसाहेबांचा कालावधी सुवर्णाक्षरांत लिहिण्यासारखा आहे. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार तेवढ्याच त्यागी जवानांना दिला जात आहे. एनडीआरएफचे जवान खरे तर पद्म पुरस्काराचे मानकरी आहेत.'' एनडीआरएफच्या जवानांच्या वतीने पराग पितांबरे यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा -  तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती बाळगा : डॉ. अनिल पाटील 

ते म्हणाले, ""आमच्या कामाची नोंद रयत शिक्षण संस्थेने घेतली हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. प्रत्येकाने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. जपान आपत्तीसाठी पूर्वतयारी करतो, तसे आपण केले पाहिजे.'' प्राचार्य डॉ. कराळे यांनी प्रास्ताविकात पुरस्काराची आणि संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ऍड. दिलावर मुल्ला यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव प्राचार्य डॉ. सावंत यांनी आभार मानले.

हेही वाचा -  वाई : शिरगाव घाटातील अपघातात एक ठार ; उस्मानाबादचे युवक जखमी

कार्यक्रमास एनडीआरएफचे जवान, सहसचिव विलास महाडिक, ऑडिटर डॉ. अरुण आंधळे, प्राचार्य शहाजी डोंगरे, प्रा. अजित पाटील, प्राचार्य आर. के. शिंदे, प्राचार्य आर. डी. गायकवाड उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com