महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाच्या पाणीवापरात कपात; वीजनिर्मितीचं पाणीही थांबवण्याचा 'जलसंपदा'चा निर्णय

कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे.
Koyna Dam Patan Satara
Koyna Dam Patan Sataraesakal
Summary

कोयना धरणातून रब्बी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे २५.४५ व १२.४१ टीएमसी असे एकूण ३७.८६ टीएमसी पाणी वापर नियोजित आहे.

सातारा : यावर्षी अल्प पर्जन्यमानामुळे धरणात कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरामध्ये कपात करण्यात आली आहे. यामध्ये रब्बी व उन्हाळी हंगामातील नियोजित पाणीवापरात ११.७१ टीएमसी प्रस्तावित केली होती.

Koyna Dam Patan Satara
कोयना धरणातून पाणी सोडण्यास शंभूराज देसाईंची आडकाठी; ताकारी योजना बंद करण्याची वेळ, कृष्णेचं पात्रही पडणार कोरडं?

त्यापैकी सिंचनाच्या पाणी वापरात २.८६ टीएमसी व वीज निर्मितीच्या पाणीवापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित केली आहे. त्यामुळे सिंचन व वीजनिर्मितीसाठी ७० टीएमसी इतकाच पाणीवापर केला जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने (Water Resources Department) दिली आहे. कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून, या वर्षी पावसाळी हंगामापूर्वी एक जून धरणात एकूण १७.६४ टीएमसी पाणीसाठा होता.

Koyna Dam Patan Satara
मोठी बातमी! ..अखेर ऊसदराची कोंडी फुटली, राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन मागे; 'इतक्या' रुपयांवर निघाला तोडगा

मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात ४४० मिलिमीटर घट, तर पाणी आवकेत ३९.७१ टीएमसी इतकी घट झाली आहे. एक जून ते १४ ऑक्टोबरदरम्यान सिंचन व वीजनिर्मितीसाठी ५.४६ व २३.०३ टीएमसी पाणीवापर झाला आहे. या या वर्षी खरीप हंगामात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांत सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार धरणामधून २.३६ टीएमसी पाणी सोडले आहे. गेल्या वर्षीपेक्षा दोन टीएमसी जादा पाणी देण्यात आले आहे.

धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे रब्बी व उन्हाळी हंगामामधील नियोजित पाणीवापरात ११.७१ टीएमसी प्रस्तावित केली आहे. त्यापैकी सिंचनाच्या पाणी वापरात २.८६ टीएमसी व वीजनिर्मितीच्या पाणीवापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंतांनी रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचन व वीजनिर्मितीसाठी ७० टीएमसी इतका मर्यादेत पाणीवापर करण्याची सूचना केली आहे.

Koyna Dam Patan Satara
Raju Shetti : पुणे-बंगळूर महामार्गावर तब्बल आठ तासांचे चक्काजाम आंदोलन; वाहतूकदारांचे हाल, 600 पोलिसांचा बंदोबस्त

सातारा, सांगलीचे नियोजन...

कोयना धरणातून रब्बी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे २५.४५ व १२.४१ टीएमसी असे एकूण ३७.८६ टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. तथापि या कपातीनुसार रब्बी व उन्हाळी हंगामधील पाणी वापर ३५ टीएमसी इतक्या मर्यादेत करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यासाठी तीन टीएमसी व सांगली जिल्ह्यासाठी ३२ टीएमसी या मर्यादेत पाणीवापर करणे नियोजित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com