शेतकरी संघटनांचे नेते हे गल्लीतले नेते ; सदाभाऊ खोत यांची खरमरीत टीका 

sadabhau khot criticism swabhimani shetkari sanghatana
sadabhau khot criticism swabhimani shetkari sanghatana

इस्लामपूर - शेतकऱ्यांच्या लुटीचे अर्थशास्त्र गेल्या कित्येक वर्षापुर्वी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी सोप्या भाषेत सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संघटनांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. सध्याच्या शेतकरी संघटनांचे नेते गल्लीतील नेते झाले आहेत. केंद्र सरकारने कृषी विधेयकाविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला भीक न घालता अजून व्यापक स्वरुपात या कृषी विधेयकाला स्वातंत्र्य देऊन शेतकऱ्यांच्या प्रती आदर भावना व्यक्त करावा, असे मत माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली. 

ते म्हणाले,‘‘शरद जोशींनी ३२ वर्षापुर्वी शेतीतील सरकारी हस्तक्षेप थांबवा, लायसन व परमीट राज संपवा, शेतकऱ्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य द्या, शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील कर्ज संपवा या मागणीसाठी त्यावेळचे शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांना घेऊन दहा लाखापेक्षा जास्त शेतकरी दिल्लीत एकत्र आणले होते. 

मात्र, टिकैत यांनी आपला प्रभाव कमी होईल हे जाणून त्यांच्या बरोबरच्या गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना फुस लावून शरद जोशींना स्टेजवरुन खाली ढकलून दिले होते. शरद जोशी रुग्णालयात ॲडमीट होते.’’ ते म्हणाले,‘‘कृषी विधेयकांविरोधात महेंद्रसिंग टिकैत यांचा मुलगा राकेश टिकैत यांनी या विधेयकांच्या आड येऊन आंदोलन सुरु केले आहे. 

या  विधेयकांविरोधात विचार, टिपण्णी, सल्ला देण्याचे केंद्र सरकारने २० फेब्रुवारी २०२१ ही अंतिम तारीख दिली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com