Agitation for Water : मोहोळ नगर परिषदेवर पाण्यासाठी 'उताणी घागर तोरण आंदोलन'

मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणारी सीना नदी दुधडी भरून वाहत आहे. केवळ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी मोहोळ शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
Agitation For Water
Agitation For Watersakal

मोहोळ : गेल्या 10 ते 12 दिवसापासून मोहोळ शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. विस्कळीत झालेला पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा या मागणी साठी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आज नगरपरिषदे वर वेगळ्या पद्धतीने 'उतानी घागर तोरण आंदोलन' करण्यात आले.

मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणारी सीना नदी दुधडी भरून वाहत आहे. केवळ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी मोहोळ शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. भर उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे शहरातील माता भगिनींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मोहोळ शहराच्या यात्रा कालावधीतही अशाच पद्धतीने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता, तेव्हा सलग दहा दिवस बेमुदत चक्री आंदोलन करून मोहोळ शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यास भाग पाडले होते.

यावेळी बोलताना रमेश बारसकर म्हणाले, मोहोळ नगर परिषदेत लोक नियुक्त बॉडी असताना पाच वर्षाच्या कार्य काळामध्ये एकदाही पाण्यासाठी आंदोलन झाले नाही, परंतु मागील दोन वर्षांमध्ये प्रशासकाच्या हातामध्ये कारभार गेल्यापासून जनतेला सातत्याने वेगवेगळ्या कामासाठी आंदोलने करावी लागत आहेत. नोकर शाहीने जनतेची कामे प्रामाणिकपणे आणि वेळेत करणे गरजेचे आहे.

आज केलेल्या आंदोलनाची तीव्रता कमी आहे, परंतु नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेऊन मोहोळ शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर पुढील काळात याही पेक्षा तीव्र आंदोलन करून मोहोळ शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू. मोहोळ शहराच्या लोकसंख्येच्या मानाने पाणी साठवण क्षमता पाच टक्केच आहे. जवळ जवळ 23 लाख लिटर पाणी साठवण करण्याची क्षमता असताना देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही हे अधिकाऱ्याचं व कामगारांचे अपयश आहे. हे शहरातील नागरिकांचे दुर्दैव आहे. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Agitation For Water
Married Life: लग्नाचं अर्धशतक ठोकणारे आजी-आजोबा पुन्हा ‘लग्नाच्या बेडीत'

सध्या नागरीक पाणी विकत घेऊ लागले आहेत,मात्र सर्वसामान्य नागरीकांना हातावरचे पोट असणारा वर्ग काम बुडवुन पाण्यासाठी बाहेर जावं लागत आहे. केवळ नियोजन नसल्यामुळे शहरावर पाणी टंचाई ओढवली आहे, त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी ताबडतोब पाण्याचे नियोजन करून पाणी सोडावे अशी मागणी अंदोलकानी केली.

या अंदोलनात अतुल क्षिरसागर, विनोद कांबळे, रियाज शेख, मंगेश पांढरे, आबासाहेब कांबळे, प्रकाश सोनवणे, जितेंद्र अष्टुळ, उमेश गोटे, शेखर माने, निलेश गरड, अजय कुर्डे, बाळासाहेब माळी, सागर अष्टुळ, अशोक सोलनकर, शशिकांत सनगर, राज गरड, ईशान खरकदारी आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com