
सोलापूर: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आली, तर सिद्धेश्वर एक्स्प्रेस मुंबईहून सुटण्याऐवजी पुण्यातून सोडण्यात आली. मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक गाड्या उशिरा सुटल्यामुळे सोलापूरलाही उशिराने पोचत आहेत. यामुळे रेल्वे प्रवासी प्रचंड त्रस्त आहेत.