Sangali : द्राक्ष बागायतदारांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे ;राजू शेट्टी

मिरज, तासगाव, कवठेमहांकाळला नुकसानग्रस्त बागांची पाहणी
Raju Shetty
Raju ShettyeSakal

सांगली : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदारांचे शंभर टक्के कर्ज माफ करा. द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. त्यांनी आज जिल्ह्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी केली. त्यांच्यासमवे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कोल्हापूरचे नेते सावकर मादनाईक होते.

Raju Shetty
Gardening Tips : झाडांची पाने पिवळी का पडतात? असू शकतात 'ही' कारणे

मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ भागातील द्राक्षबागांची पाहणी केल्यानंतर शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी या संकटात संपूर्ण आधार मिळायला हवा, अशी भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारने नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची कर्जे माफ करायला हवीत. तसेच द्राक्ष पीक विमा योजना शेतकरी हिताची नसून केवळ कंपनी हिताची आहे. त्यामुळे ती बदलायला हवी.

राज्य सरकारने मदतीचा हात न दिल्यास रस्त्यावर उतरून न्याय देऊ.’’

या वेळी पोपट मोरे, संजय बेले, संजय खोलखुंबे, भरत चौगुले, नंदू नलवडे, श्रीधर उदगावे, बाळासाहेब सुरेश वसगडे, सुहास केरीमाने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. कोंगनोळी येथील सागर वावरे शेतकऱ्याने द्राक्षबागेचे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com