शेतकऱ्यांचा 'डीसीसी'वर वाढला भरोसा! खरीपात 112 कोटींचे कर्ज वाटप

शेतकऱ्यांचा 'डीसीसी'वर वाढला भरोसा! खरीपात 112 कोटींचे कर्ज वाटप
Updated on
Summary

खरीप हंगामात जिल्ह्यातील 23 बॅंकांच्या तुलनेत जिल्हा बॅंकेने सर्वाधिक 111 कोटी 91 लाखांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली.

सोलापूर : अडचणीतील जिल्हा बॅंकेने आता मागेल त्या शेतकऱ्याला पीक पाहून कर्ज देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तर तीन लाखांपर्यंत विनाव्याजी पीक कर्जही (Crop debt) दिले जात आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांच्या तुलनेत कमी हेलपाटे अन्‌ तत्काळ कार्यवाही होत असल्याने शेतकऱ्यांचा जिल्हा बॅंकेवरील विश्‍वास पुन्हा वाढू लागला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील 23 बॅंकांच्या तुलनेत जिल्हा बॅंकेने सर्वाधिक 111 कोटी 91 लाखांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली. (solapur district bank has disbursed rs 112 crore in kharif loans)

शेतकऱ्यांचा 'डीसीसी'वर वाढला भरोसा! खरीपात 112 कोटींचे कर्ज वाटप
कोरोनाच्या मृत्यूपासून एक लाख सहा हजार व्यक्‍ती सुरक्षित

शंभर वर्षे पूर्ण झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ग्रामीण अर्थकारणाला मोठा हातभार लावला. कारखानदारी वाढली, अनेकांना रोजगारही मिळाला. रब्बीचा जिल्हा म्हणून असलेली ओळख आता खरीपाचा जिल्हा म्हणून होऊ लागली. मात्र, अनियमित कर्ज वाटप आणि वसुलीतील घटीमुळे बॅंक अडचणीत सापडली. तत्कालीन सरकारने बॅंकेवर प्रशासकाची नियुक्‍ती केली. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोनदा कर्जमाफी (दीड व दोन लाखांपर्यंत) झाली आणि त्यातून बॅंकांची थकबाकी वसूल होण्यास मदत झाली.

शेतकऱ्यांचा 'डीसीसी'वर वाढला भरोसा! खरीपात 112 कोटींचे कर्ज वाटप
बालविवाह वाढूनही बाल कल्याण समित्या झोपलेल्याच

प्रशासकांनी काही संस्थांचा लिलाव करून त्यातून थकबाकी वसूल केली. आता बॅंकेचा एसएलआर, सीआरआर चांगला असून राज्य सहकारी बॅंकेकडूनही जिल्हा बॅंकेला कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचा कर्ज मागणीसाठी बॅंकेकडे ओढा वाढत असून लॉकडाउन काळात जिल्ह्यातील एक हजार 16 शेतकऱ्यांनी कर्जासाठी ऑनलाइन अर्ज केले. त्यात सर्वाधिक अर्ज बॅंक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकांचेच असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी दिली.

शेतकऱ्यांचा 'डीसीसी'वर वाढला भरोसा! खरीपात 112 कोटींचे कर्ज वाटप
पोलिस दलातील संघर्षयोध्दा कोरोनाचा बळी

उद्दिष्ट 1270 कोटींचे; बॅंकांकडून कर्जवाटप 301 कोटींचेच

स्टेटलेव्हल बॅंकर्स कमिटीने (एसएलबीसी) खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बॅंकांनी एक हजार 270 कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. त्यापैकी आतापर्यंत 301 कोटींचेच कर्ज वाटप झाले असून त्यात सर्वाधिक जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना 111 कोटी 91 लाखांचे कर्ज दिले आहे. तर उर्वरित 22 बॅंकांनी खरीपात 200 कोटींचे कर्ज वितरीत केले आहे. बार्शी, माढा, मोहोळ, करमाळा, पंढरपूर, अक्‍कलकोट या तालुक्‍यातून सर्वाधिक कर्ज मागणीचे अर्ज बॅंकांकडे आले आहेत.

शेतकऱ्यांचा 'डीसीसी'वर वाढला भरोसा! खरीपात 112 कोटींचे कर्ज वाटप
अनलॉकनंतर वाढली सोलापूरातील रूग्णसंख्या

एसएलबीसी'ने खरीपासाठी ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार संबंधित बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही निर्देश दिले आहेत. कर्ज मागणीसाठी प्राप्त ऑनलाइन अर्ज संबंधित बॅंकांकडे वर्ग केले असून त्यांनी पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊन त्या शेतकऱ्यास कळविणे क्रमप्राप्त आहे.

- प्रशांत नाशिककर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, सोलापूर

(solapur district bank has disbursed rs 112 crore in kharif loans)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.