
Angry sugarcane farmers in Solapur demand ₹33 crore FRP dues from five sugar mills ahead of Diwali.
Sakal
माळीनगर : यंदाच्या ऊस गाळप हंगामाची तारीख जाहीर झाली असली तरी व आरआरसी कारवाई होऊन देखील सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांकडे अद्यापही ३३.२६ कोटी रुपये एफआरपी थकली आहे. दिवाळी तोंडावर येऊन देखील आठ महिन्यांनंतरही एफआरपी न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच एफआरपी व जाहीर केलेल्या ऊस दराव्यतिरिक्त मागील हंगामात गाळप झालेल्या उसाची दिवाळीसाठी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे ऊसबिले मिळावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.