मोहोळ - शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प 86 हजार 300 कोटींचा आहे, मात्र तो दीड लाख कोटी रुपयाचा जरी झाला तरी तो पूर्ण होईल की नाही याची खात्री नाही..विकासाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या थडग्यावर विकासाचे मनोरे बांधू नका. या प्रकल्पामुळे 55 हजार शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यासाठी या महामार्गाला ताकतीने विरोध करा, सर्वे होऊ देऊ नका असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी व वस्तुस्थिती शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी 'मोहोळ तालुका शक्तीपीठ बाधित शेतकरी संघर्ष समिती"च्या वतीने माजी खासदार शेट्टी यांच्या सभेचे मोहोळ येथे आयोजन केले होते त्यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते..माजी खासदार शेट्टी म्हणाले, यापूर्वीचा महामार्ग, पालखी मार्ग यांना जेवढा शेतकऱ्यांना मोबदला मिळाला तेवढा शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींना मिळणार नाही. कारण शासनाने शेतकऱ्यांना ज्यादा पैसे मिळू नयेत यासाठी सन 2022 च्या कायद्यात सुधारणा करून तशी तरतूद केली आहे.या शक्तीपीठ प्रकल्पामुळे जमिनी कसता येणार नाहीत, तर जमिनीत जाण्यासाठी पाणंद रस्त्यांची ही वाट लागणार आहे. मोठा पाऊस पडला तर या रस्त्यावरून पाणी वाहून जाण्याचा कुठेही मार्ग नाही..मुख्यमंत्र्यांचे बगलबच्चे म्हणतात की, या शक्तीपीठ मुळे विदर्भ मराठवाड्याचा विकास होणार आहे. एवढी विकासाची खास असेल तर ज्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या गावातील गट नंबर निहाय जमिनीचे दर जाहीर करून तलाठी कार्यालयात याद्या लावाव्यात..जे विकासाचा प्रचार करतात त्यांच्या मिशीला खरकटे लागले आहे. शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाचे ही पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ते या रस्त्यासाठी संपादित जमिनीचे काय देणार आहेत. शासनाकडे भांडवल नाही मग शेतकऱ्यांच्या जमिनी हेच भांडवल समजा व वसूल होणाऱ्या टोलमध्ये शेतकऱ्यांना हिस्सा द्या.यावेळी अॅड. श्रीरंग लाळे, दिनेश घागरे, शाहू देशमुख, सत्यवान देशमुख, विजय रणदिवे, बाळासाहेब पवार, पप्पू पाटील, रवींद्र इंगळे आदी उपस्थित होते. सत्यवान देशमुख, दिनेश घागरे, शाहू देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन व आभार अॅड लाळे यांनी मानले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
मोहोळ - शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प 86 हजार 300 कोटींचा आहे, मात्र तो दीड लाख कोटी रुपयाचा जरी झाला तरी तो पूर्ण होईल की नाही याची खात्री नाही..विकासाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या थडग्यावर विकासाचे मनोरे बांधू नका. या प्रकल्पामुळे 55 हजार शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यासाठी या महामार्गाला ताकतीने विरोध करा, सर्वे होऊ देऊ नका असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी व वस्तुस्थिती शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी 'मोहोळ तालुका शक्तीपीठ बाधित शेतकरी संघर्ष समिती"च्या वतीने माजी खासदार शेट्टी यांच्या सभेचे मोहोळ येथे आयोजन केले होते त्यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते..माजी खासदार शेट्टी म्हणाले, यापूर्वीचा महामार्ग, पालखी मार्ग यांना जेवढा शेतकऱ्यांना मोबदला मिळाला तेवढा शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींना मिळणार नाही. कारण शासनाने शेतकऱ्यांना ज्यादा पैसे मिळू नयेत यासाठी सन 2022 च्या कायद्यात सुधारणा करून तशी तरतूद केली आहे.या शक्तीपीठ प्रकल्पामुळे जमिनी कसता येणार नाहीत, तर जमिनीत जाण्यासाठी पाणंद रस्त्यांची ही वाट लागणार आहे. मोठा पाऊस पडला तर या रस्त्यावरून पाणी वाहून जाण्याचा कुठेही मार्ग नाही..मुख्यमंत्र्यांचे बगलबच्चे म्हणतात की, या शक्तीपीठ मुळे विदर्भ मराठवाड्याचा विकास होणार आहे. एवढी विकासाची खास असेल तर ज्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या गावातील गट नंबर निहाय जमिनीचे दर जाहीर करून तलाठी कार्यालयात याद्या लावाव्यात..जे विकासाचा प्रचार करतात त्यांच्या मिशीला खरकटे लागले आहे. शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाचे ही पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ते या रस्त्यासाठी संपादित जमिनीचे काय देणार आहेत. शासनाकडे भांडवल नाही मग शेतकऱ्यांच्या जमिनी हेच भांडवल समजा व वसूल होणाऱ्या टोलमध्ये शेतकऱ्यांना हिस्सा द्या.यावेळी अॅड. श्रीरंग लाळे, दिनेश घागरे, शाहू देशमुख, सत्यवान देशमुख, विजय रणदिवे, बाळासाहेब पवार, पप्पू पाटील, रवींद्र इंगळे आदी उपस्थित होते. सत्यवान देशमुख, दिनेश घागरे, शाहू देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन व आभार अॅड लाळे यांनी मानले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.