भीमानगर : काही वर्षांपासून राज्यात उसाचे उत्पादन विक्रमी होत आहे. मात्र संघटित साखर कारखानदारांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित ऊसदर अजूनही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी कायम तोट्यातच राहिला. साखर कारखानदार नेहमीच ऊसदराआडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असून ''शेतकरी घाम गाळतात अन् मलिदा मात्र साखर कारखानदार खातात! असा घणाघात माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.