सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणात पुणे व परिसरातील एमआयडीसीतून मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त द्रव मिसळत आहे. त्यामुळे धरणातील पाणी मोठ्याप्रमाणावर प्रदूषित होत आहे. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी झाली असून जनावरांच्या दूध उत्पन्नावर विपरित परिणाम झाल्याचा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाने काढला आहे. विद्यापीठातील रसायनशास्त्र, पर्यावरण शास्त्र व सामाजिक शास्त्र संकुलातर्फे धरणातील पाण्याचे नमुने पडताळण्यात आले आहेत.
उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यातील 51 गावे अन् 47 हजार कुटुंब बाधित झाली. विद्यापीठाकडून सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी दोन तर नगर जिल्ह्यातील एका गावातील 288 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. उजनी धरणातील विविध 11 ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासणीला घेतले. मात्र, केमिकलयुक्त द्रव धरणातील पाण्यात मिसळल्याने पोटाचे विकार वाढले असून जनावरे आजारी पडू लागली आहेत. तरीही सोलापूकरांना नाईलाजास्तव जडत्व असलेले पाणी प्यावे लागत आहे. महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी शुध्द करुन शहराला पुरवठा केले जाते. तरीही पाण्यातील जडत्व जास्त असल्याचा खुलासा महापालिका आयुक्त दिपक तावरे यांनी नुकताच केला.
हेही वाचा - सोलापूर झेडपीत कॉंग्रेसने का घेतली माघार ?
दरम्यान, धरणातील पाणी शुध्द राहावे, मासेमारीचा व्यवसाय उत्तम चालावा यासाठी धरण परिसरातील एमआयडीसीतून येणारे केमिकलयुक्त पाणी थांबवणे काळाची गरज असल्याचे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने व्यक्त केले आहे. सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ व्ही. पी. धुळप, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. जी. माळी यांनी या संशोधनासाठी पुढाकार घेतला.
हेही वाचा - राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची 'डेडलाईन'
सर्वेक्षणातील ठळक बाबी...
महाराष्ट्र
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.