Vidhan Sabha 2019 : पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात सहा तासात 33.86 टक्के मतदान

Sangali-District
Sangali-District

सांगली : सकाळच्या टप्प्यात पावसाच्या हजेरीमुळे संथगतीने मतदान प्रक्रिया सुरू होती. नंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदानाचा टक्का वाढत चालल्याचे चित्र दिसून आले. दुपारी एकपर्यंत म्हणजे सहा तासात जिल्ह्यात 33.86 टक्के मतदान झाले आहे. आता उर्वरीत पाच तासात किती टक्के मतदान होणार? याची उत्सुकता लागली आहे.

दोन दिवस पावसाची रिपरिप सुरूच असून सर्वत्र पाणी साचले आहे. शहरातील शामरावनगर परिसरासह अनेक ठिकाणी पावसाने दैना उडाली आहे. तशातच नदीकाठच्या सूर्यवंशी प्लॉट परिसरात नागरिकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. ग्रामीण भागातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सायंकाळी मतदानाची वेळ संपण्यापूर्वी मतदारांना घराबाहेर काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.

अनेक मतदान केंद्रावर पावसाने चिखल आणि दलदल निर्माण झाली आहे. तरीही मतदार चिखलातून वाट काढत मतदानासाठी हजेरी लावत आहेत. उत्साही मंडळी मतदान केल्याची खूण दाखवत सोशल मीडियावर 'तुम्ही मतदान केलं काय?' असा सवाल विचारत आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे : (दुपारी 1 पर्यंत) 

मिरज- 26.72 टक्के, सागंली- 30.23 टक्के, इस्लामपूर- 40.13 टक्के, शिराळा- 40.30 टक्के, पलूस-कडेगाव- 40.14 टक्के,
खानापूर- 31.89 टक्के, तासगाव-कवठेमहांकाळ- 32.13 टक्के, जत- 31.36 टक्के याप्रमाणे मतदानाची टक्केवारी होती. जिल्ह्याची एकूण सरासरी टक्केवारी दुपारी एकपर्यंत 33.86 टक्के इतकी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com