पिंपरी : गेल्या चार दिवसांपासून प्रखर ऊन, पितृपक्ष व सलग दोन दिवस सुट्या. यामुळे घराघरांत पाण्याची तुलनेने जास्त गरज भासू लागली. मात्र, कधी महावितरण, तर कधी महापालिका यांच्यातील तांत्रिक अडचणींमुळे सलग चार दिवस शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. यामुळे करदात्या नागरिकांवर 'पाणी-पाणी' म्हणण्याची वेळ आली आहे.
ही आहे वस्तुस्थिती...
महावितरण म्हणते...
शुक्रवारी रात्री 11 वाजता रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला होता. मात्र, महावितरणने लगेचच तांत्रिक उपाययोजना करून 50 मिनिटांनी पर्यायी व्यवस्थेद्वारे या केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत केला. हा 50 मिनिटांचा अपवाद वगळता महावितरणकडून रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित होण्यासाठी महावितरण जबाबदार नाही, असे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी कळविले आहे.
महापालिका म्हणते...
पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून एका तासात सरासरी 20 दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जातो. म्हणजेच शुक्रवारी एक तास वीजपुरवठा खंडित झाल्याने 20 दशलक्ष लिटर जलउपसा करू शकलो नाही. शिवाय, सर्व पंप सुरू करण्यासाठी साधारणतः अर्धा तास लागतो. यामुळे पाच दशलक्ष लिटर पाणी उपसा कमी होतो. परिणामी शहरातील पाणीपुरवठा विस्कळित, कमी दाबाने व अनियमित होण्यावर त्याचा परिणाम होतो, असे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले.
नागरिक म्हणतात...
गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून दिवसाआड पाणी मिळत आहे. पाण्याचा साठा करून ठेवावा लागत आहे. आमच्या भागात गुरुवारी सायंकाळी पाणी आले नाही. शनिवारी थोडेफार मिळाले. आज रविवारीसुद्धा नळाला पाणी आले नाही. साठवलेले पाणीसुद्धा संपले होते. त्यामुळे 30 रुपयाला एक जार या प्रमाणे दोन जार म्हणजे चाळीस लिटर पाणी विकत घ्यावे लागले, असे खासगी कंपनीत अभियंता असलेले बिजलीनगर येथील शैलेश चव्हाण यांनी सांगितले.
वीज व जलउपशाचे गणित
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.