

BHARAT JADHAV ON JATRA
ESAKAL
मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार म्हणून भरत जाधव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करत प्रेक्षकांना आपल्या अचाट अभिनयाने चकीत केलंय. 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदरपंत', 'मोरूची मावशी' यांसारखी नाटकं असोत किंवा 'पछाडलेला', 'जत्रा' सारखे सिनेमे असोत. त्यांनी कायमच प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. भरत यांचा 'जत्रा' सिनेमा प्रचंड गाजला. याच सिनेमाने त्यांना ओळख मिळवून दिली. आता नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'जत्रा'च्या वेळेसचा अनुभव सांगितलाय.