Premium|IRDAI women insurance report : भारतातील ६५ कोटी महिला विम्यापासून वंचित; आयआरडीएआयने व्यक्त केली गंभीर चिंता

Life Insurance for Women in India : देशातील ६५ कोटी महिलांपैकी अत्यल्प महिलांकडेच आयुर्विमा असून, आयआरडीएआयच्या अहवालानुसार महिलांचा विमा क्षेत्रातील सहभाग वाढवणे ही सामाजिक सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक विकासासाठी काळाची गरज बनली आहे, तसेच यात मोठी बाजारपेठही उपलब्ध आहे.
IRDAI women insurance report

IRDAI women insurance report

esakal

Updated on

कॅस्परस जे. एच. क्रोमहाउट

भारतातील महिलांसाठी आयुर्विमा संरक्षणाची तफावत ही गंभीर आणि चिंताजनक बाब बनली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) यांच्या २०२३-२४ च्या वार्षिक अहवालानुसार, महिलांचा मोठा वर्ग अजूनही विमा सेवांपासून वंचित आहे. देशात ६५ कोटींहून अधिक महिला लोकसंख्या असताना अत्यल्प महिलांकडे विमा संरक्षण आहे. सामाजिक सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन मजबूत करण्यासाठी महिलांपर्यंत विमा संरक्षण पोहोचवणे ही काळाची गरज ठरते.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) वर्ष २०२३-२४ च्या अहवालात श्रमजीवी महिलांचा सेवांपासून वंचित गट म्हणून उल्लेख केला आहे. विमा नियामकाच्या माहितीनुसार, आयुर्विम्याचा प्रवेश दर (जीडीपीच्या टक्केवारीत व्यक्त केलेला प्रीमियम) केवळ २.८ टक्के इतका कमी आहे; तसेच देशात विकल्या जाणाऱ्या एकूण पॉलिसींमधील ३५ टक्क्यांपेक्षा कमी पॉलिसी महिलांना विकल्या जातात. याचा अर्थ असा, की सुमारे ६५ कोटींहून अधिक महिला-लोकसंख्या असलेल्या देशात दोन टक्क्यांपेक्षाही कमी महिला आयुर्विमा खरेदी करतात. हा गट अत्यंत वैविध्यपूर्ण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com