Bengal Election: Why Did Voters Reject Mamata Banerjee? The Food Politics Behind Jhalmuri vs Fish
E sakal
Bengal Verdict Explained: Identity, Food Politics, and the Fall of TMC
कोलकाता: बंगाल निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि मोदींचा भाजप व ममतांचा तृणमूल काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. पण ही निवडणूक केवळ हिंदुत्व आणि घुसखोरीपुरती मर्यादित राहिली नाही… ती थेट मतदारांच्या ताटात पोहोचली. मोदींची झालमुरी विरुद्ध ममतादीदींचे मासे - या ‘फूड पॉलिटिक्स’मध्ये मतदारांनी नेमकं काय निवडलं? ताटातलं अन्न आणि अस्मिता की विकासाची आशा? जाणून घ्या सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.
भाजप म्हणजे संपूर्ण देशावर कब्जा करणारा पक्ष असून बंगालच्या अस्मितेसाठी हे संकट आहे, असं म्हणत तृणमूल काँग्रेसने भीती निर्माण केली. मात्र ही भीती बंगालने फोल ठरवली. भाजपच्या हिंदु एकीकरण, शाकाहारी वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ममतादीदींनी माशांचा मुद्दा उपस्थित केला. पण भाजपने झालमुडी मुत्सद्देगिरी करत हा हल्ला परतवून लावला. बंगालच्या निवडणुकीत नेमका कोणता मुद्दा महत्त्वाचा ठरला?