चकोर गांधी:
येत्या २१ एप्रिल रोजी श्री भगवान महावीर जयंती आहे. भगवान महावीर यांच्या जन्माला २६०० पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. भगवान महावीरांनी जगाला दिलेली शिकवण, तत्त्वे आजही लागू होतात. त्यांनी सांगितलेली तत्त्वे उत्तम व्यवसाय आणि व्यवस्थापनालाही लागू पडतात. ही तत्त्वे अंगीकारल्यास उत्तम व्यवसाय करता येऊ शकतो.
भगवान महावीर यांनी अनेक वर्षांपूर्वी सांगितलेली तत्त्वे अतिशय सोपी वाटणारी आहेत. परंतु, त्यावर अंमल करणे तितकेच कठीण आहे. ही तत्त्वे आपण आचरणात आणू शकलो, तर व्यवसाय उत्तमपणे आणि समाधानाने, आनंदानेही करता येईल. सर्वांना त्यात समाविष्ट करून घेता येईल.